✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 29/04/2017 वार - शनिवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
🌷 📆 . . *दिनविशेष . . 📆* 🌷
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
💥जन्म :-
⌛१८४८ : राजा रविवर्मा, नामवंत भारतीय चित्रकार.
⌛१९३६ : झुबिन मेहता, भारतीय संगीतकार.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
1⃣ सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे १ मे रोजी ‘महाराष्ट्र दिन’सोबतच ‘दुर्ग दिन’ साजरा करण्यात येणार आ
2⃣ छत्तीसगडमध्ये जीएसटी विधेयक मंजूर, जीएसटी विधेयक मंजूर करणारे पाचवे राज्य.
3⃣ अकोला येथील पोलीस अधीक्षक किशोरचंद मीना नांदेडचे नवीन पोलीस अधीक्षक.
4⃣ दिल्ली सरकार सुद्धा महापुरूषांच्या जयंती व पुण्यतिथीच्या सुट्टया रद्द करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली. याआधी उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सरकारने या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
5⃣ सोलापूर शहर परिसर व इंगळगी ( तालुका दक्षिण सोलापूर) येथे काल पडला अवकाळी पाऊस
6⃣ आर्थिक अडचणीतील जिल्हा मध्यवर्ती बँकांचं शिखर बँकेत विलीनीकरण करा, खरीप आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांचं मत.
7⃣ आयपीएल 10 - गौतम गंभीर - उथप्पाची दमदार फलंदाजी, कोलकात्याचा दिल्लीवर सात विकेटने विजय तर हैदराबादचा पंजाबवर 26 धावांनी विज
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*""फ्रेश सुविचार""*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*काही मिळाले किंवा नाही मिळाले, तो नशिबाचा खेळ आहे, पण.... ,*
*प्रयत्न इतके करा की, परमेश्वराला देणे भागच पडेल...*
*संकलक :- वैजनाथ जाधव, वसमत*
7756968704
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*नशीब*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
🎂 *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
👤 लोकेश कन्हैयालाल सूर्यवंशी
👤 सौ. नीलम गायकवाड, शिक्षिका, पुणे
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
---------------------------------------------------
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*!!! @@ गुगली @@ !!!*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*" कोडगे "*
आज कालचे माणसं
फार कोडगे आहेत
दिशाहिन भरकटलेले
हे तर होडगे आहेत
माणसाचा वैचारिक पाया
एकदम पक्का असावा
निश्चित भूमिकेचा माणूस
एकशेएक टक्का असावा
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔 जाहिरात 🔔 🔔*
*डॉ. आंबेडकरांसारखे होता येईल काय*
खालील लिंक वर लेख वाचून आपल्या प्रतिक्रिया ब्लॉग वरच लिहा
http://nasayeotikar.blogspot.com/2017/04/blog-post_12.html
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी जयंती दिनांक निमित्त अभिवादन
----------------------------------------------------
*आजचा*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
•••●🌟‼ *विचार धन* ‼🌟●•••
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*कोणत्याही गोष्टीचे सखोल चिंतन चांगले काम करण्यास प्रवृत्त करत असते. त्यामुळे जाणिवा तर समृद्ध होतातच; पण समजही वाढत जाते. कळण्याची पातळी उंचावते आणि जगण्यातही आनंद निर्माण होऊ लागतो. आनंद आला की सौंदर्य आले. अशी ही श्रृंखला आहे. त्यात धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या नावाने अडसर तयार करणे आनंद मिळविण्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरेल. त्यामुळे शरीरस्वास्थ्याचा, मन:स्वास्थ्याचा आणि परिणामी समाजस्वास्थ्याचा विचार करताना आकाशासारखा व्यापक गुणधर्म ठेवायला हवा. त्याशिवाय तरणोपाय नाही.*
*त्यासाठी रोजच्या वेळेतील सकाळची अगदी दहा मिनिटे स्वत:ला द्यावीत. त्यात सुरूवातीची तीन मिनिटे काल काय केले आणि काय राहिले याची उजळणी, पुढची दोन मिनिटे त्यात झालेल्या चुका आणि उरलेली पाच मिनिटे आज काय करायचे याला द्यायला हवीत. त्यात काल ज्या चुका झाल्या त्याची पुनरावृत्ती न होऊ देण्याविषयी स्वत:ला बजावायला हवे. तरच निश्चयाने पाऊल पुढे टाकता येईल. अन्यथा 'ये रे माझ्या मागल्या' किंवा 'जन्माला आला.....' या दोन प्रसिद्ध म्हणी आपल्यासाठीच आहेत असे समजायला हरकत नाही.*
••●⚜‼ *रामकृष्णहरी* ‼⚜●••
⚜⚜⚜⚜⚜⚜
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
9167937040
----------------------------------------------------
*आज*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
🎯 विचारवेध...........✍🏻
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
तुम्ही कुणावर विश्वास ठेवा अथवा ठेऊ नका पण तुम्ही तुमच्या मनातून काम करत असलेल्या कामावर विश्वास ठेवा.कारण मनातून केलेले काम हेच तुमच्या विश्वासाचे खरे प्रतिक आहे.तीच तुमच्या विश्वासाने केलेल्या कामाची पावती आहे.या तुमच्या कामावरच लोक विश्वास ठेवतात.तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतीलच असे नाही परंतु तुम्ही मनातून केलेल्या तुमच्या कामावर नक्कीच विश्वास ठेवतील.हीच तुमची खरी ओळख व विश्वासाने केलेल्या कामाची पावती आहे.
- व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद.9421839590/
8087917063.
🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃
---------------------------------------------------
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
🌷🍃 *वपुर्झा* 🌷🍃
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
कोर्टात न्याय मिळत नसून, कोर्टात जे मिळतं त्याला न्याय म्हणावा लागतो.
~ वपु काळे | वपु 85
*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
9975704211
----------------------------------------------------
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
🌷🍃 *आजची बोधकथा*🌷🍃
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*आरसा*
एक गुरूंच्या घरी एक शिष्य मनोभावे गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्याच्या या सेवेमुळे गुरु त्याच्यावर प्रसन्न होते. शिक्षण् पूर्ण झाल्यावर विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाला तेव्हा गुरुंकडे त्याने जाण्याची आज्ञा मागितली तेव्हा गुरुंनी त्याला आशीर्वाद म्हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्य आरसा (दर्पण) असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला. हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्यासाठी त्याने लगेच आपल्या गुरुंसमोर हा आरसा धरला व गुरुंच्या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुंच्या समोर आरसा धरताच त्याच्या चेह-यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुंच्या अंतकरणात मोह, अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्याला याचे फारच दु:ख झाले की आपण ज्या गुरुची मनोभावे पूजा केली, ज्यांना पूर्ण ईश्र्वराचा दर्जा दिला त्यांच्या मनातही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्याला वैषम्य वाटले. तो गुरुंना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला, रस्त्यात भेटणा-या प्रत्येकाच्या मनातील भाव पाहणे हे त्याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्याने आपल्या प्रत्येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला. त्याला प्रत्येकाच्या हृदयात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्याने आपल्या जन्मदात्या आई वडीलांच्या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्यातून सुटले नाहीत. त्यांच्या हृदयात पण त्याला काही ना काही दुर्गुण दिसले. शेवटी या गोष्टीचा त्याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरुंकडे धावला. गुरुंपाशी जाऊन मोठ्या विनम्रपणे तो म्हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्या या आरशातून प्रत्येकाच्या मनात, हृदयात, अंत:करणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्येकाच्याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. एखाद्याच्या मनात कमी तर कुणाच्या मनात जास्त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दु:खी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.’’ गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्याच्याकडे केला आणि काय आश्र्चर्य त्याला त्याच्या मनाच्या प्रत्येक कोप-यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्हणाले,’’ वत्सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्यासाठी दिला होता पण तू दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच कालात जर तू जर स्वत:चे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते. याच काळात तु एक असामान्य व्यक्ती झाला असता. मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.’’
*तात्पर्य*
आपण नेहमीच दुस-या व्यक्तीचे दुर्गुण बघतो, त्यावर टीका करतो पण आपल्यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात नाही. कधीतरी जर आपण आत्मनिरीक्षण केले तर आपल्यालाही आपले दुर्गुण सापडतीलच.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment