FM Buletin Date 26/11

1⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹
📱 9970558244
🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢
📱 9423625769
🕖 प्रसारण वेळ : 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 26/11/2016 वार -
========***********=========
               📆 . . दिनविशेष . . 📆

          *भारतीय संविधान दिन*
⏳२००८ : मुंबई येथे झालेल्या सर्वात मोठ्याआतंकवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर यांच्यासह १८ पोलीस कर्मचारी शहीद झाले.
💥 जन्म :-
⏳१९२६ : प्रभाकर नारायण पाध्ये ऊर्फ भाऊ पाध्ये, मराठी कादंबरीकार, कामगार चळवळकर्ते
💥 मृत्यू :-
⏳१९९४ : भालजी पेंढारकर, चित्रपटमहर्षी.
✏ सौजन्य : -
www.marathimati.com
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ पंजाबशी माझ्ये रक्ताचे नाते आहे, माझा जन्म गुजरातमध्ये झाला पण काम करण्याची संधी पंजाबपासून मिळाली पंतप्रधान नरेंद्र मोदी.
2⃣ चीनमध्ये 6.9 रेश्टर स्केलचे भुंकपाचे धक्के, कोणत्याही जिवितहाणीचे वृत्त नाही - EMSC वृत्त
3⃣ राज्य शासनाकडून प्राप्त निर्देशानुसार महावितरण वीजबिल भरण्यासाठी १५ डिसेंबर २०१६ पर्यंत घरगुती व वैयक्तिक ग्राहकांच्या जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारणार.
4⃣   टाटा स्टीलने सायरस मिस्त्री यांना चेअरमन पदावरून हटवून त्यांच्याजागी ओपी भट्ट यांची नियुक्ती केली.
5⃣ नाशिक शहरात उद्या शनिवारपासून हेल्मेटसक्ती, पोलीस आयुक्तांची घोषणा.
6⃣ हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी मरिअम्मा कोशी यांची निवड, नरिंदर बत्रा एफआयएचचे अध्यक्ष झाल्यानंतर मरिअम्मा यांची नियुक्ती
7⃣  हाँगकाँग ओपन सुपर सीरिजमध्ये बॅडमिंटन टूर्नामेंटच्या क्वार्टर फायनलमध्ये सायना नेहवाल पराभूत.
🇮🇳 सौजन्य -
http://m.lokmat.com
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.

[ या बुलेटिनसाठी सुविचार पाठवू शकता. ]
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
             *आयुष्य*
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 संजय बोंटावार, किनवट
👤 अर्जून यनगंटीवार
👤 मुरलीधर हंबर्डे पाटील, नांदेड

[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा पाठवू शकता. ]
========***********=========
*आजचा*
*🎯विचारवेध......   ✍🏻*
--------------------------
लेखणी चालते ती प्रत्येकाच्या मनातल्या चांगल्या विचाराने.जे चांगले विचार मानवी जीवनाला समृध्द करतात आणि नवी दिशा देतात..त्यावर मानवी जीवनाच्या विविध पैलू मांडून सादर करण्याचे काम खरे ही लेखणी करते.लेखणी समृध्द नसेल तर विचारही समृध्द होत नसतात.म्हणून मनाला आणि विचाराला प्रगत करण्याचे काम हे लेखणीवरच  अवलंबून आहे.म्हणून अशा लेखणीला सतत चालू ठेवावे की,ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये चैतन्य आणि लिहिण्याचे धाडस केवळ लेखणीतच आहे.

- व्यंकटेश काटकर,नांदेड
  भ्रमण.9421839590.

🌹✍🏻🌹✍🏻🌹✍🏻🌹✍🏻
========***********=========
*आजची लिंक*
*भारतीय संविधान दिवस - 26 नोव्हेंबर*

http://nasayeotikar.blogspot.com/2016/11/sanvidhan-din.html

*हार्दिक शुभेच्छा*
========***********=======
*आजची बोधकथा

*♻  क्रोधावरील उपाय संयम*  ♻
=========================
एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम
आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात
असताना रात्रीच्या वेळी काहीच
न कळाल्याने रस्ता चुकले.
जंगल घनदाट होते, तेथे न पुढे
जाण्याचा मार्ग दिसत होता न मागे येण्याचा.
तेव्हा तिघांनीही असा निर्णय
घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे.
    तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले.
पहिली पाळी सात्यकीची होती.
सात्यकी पहारा करू लागला

तेव्हाच झाडावरून एका पिशाच्चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलावू
लागले.
  पिशाच्चाने बोलावलेले पाहून
सात्यकी संतापला व क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला. त्याक्षणी पिशाच्चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्लयुद्ध झाले. पण जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा होई व ते सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे.

एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व
त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले.
सात्यकिने त्यांना पिशाच्चाबदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्चाने मल्लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्चाशी लढायला गेले तर त्याचा आकार त्यांना वाढलेला  दिसून आला. ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाच्चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती.

पिशाच्चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आव्हान दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पहात राहिले. पिशाच्च अजून संतापले व
मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले पण श्रीकृष्ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले
व एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसे जसे पिशाच्चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट
झाली शेवटी आकार लहान होत
होत पिशाच्चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णांनी अलगद
त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले.
  सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले,
"तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते. त्याला शांती हेच औषध
आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो.
मी शांत राहिलो म्हणून हे पिशाच्च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे.

तात्पर्य : क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो.
क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे, प्रेमानेच कमी करता येते, नष्ट करता येते.
क्रोधाचे हे पिशाच्च बाहेर कोठे नसून,  आपल्या विचारातच वसत असते.
〰〰〰〰〰〰〰〰〰
*📝 संकलन / समूह प्रशासक*
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
*©मराठीचे शिलेदार समूह*
🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========

Comments