*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 24/12/2016 वार - शनिवार
========***********=========
📆 . . *दिनविशेष . . 📆*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*भारतीय ग्राहक दिन*
🎀 १९१९ विश्वभारती विद्यापीठ सुरु
🎀 १५२४ पोर्तुगीज दर्यावर्ती वास्को_द_गामा स्मृतिदिन
🎀 १८९९ साने गुरुजी जन्मदिन
🎀 १८१८शक्तिच्या अविनाशित्वाचा शोध लावणारा संशोधक जेम्स प्रिस्कॉट ज्यूल यांचा जन्म झाला.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ 30 तारखेपर्यंत नवा महाधिवक्ता नियुक्त करणार, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती.
2⃣ प्रत्यक्ष रोखीऐवजी डिजिटली पेमेंट करण्याचे प्रमाण वाढले आहे त्यापार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने डिजिटल पेमेंट आणि ई-कॉमर्स कंपन्यांना सायबर सुरक्षा वाढवण्याची सूचना
3⃣ पासपोर्टसाठी आधार कार्डावरील जन्मतारीख पुरावा म्हणून स्वीकारणार.
4⃣ संरक्षण मंत्रालयाने आणखी एक सी-17 विमान विकत घ्यायला दिली मंजुरी, 9300 कोटींच्या आधुनिकीकरणाच्या प्रकल्पांना दिली मंजुरी.
5⃣ पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 16 उमेदवारांची यादी केली जाहीर.
6⃣ मिरवणुकांमध्ये डिजेवर संपूर्ण बंदीचा विचार करा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश.
7⃣ अंडर -19 आशिया चषक स्पर्धेत भारताचा श्रीलंकेवर 34 धावांनी विजय.
💥 ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
जो करी मनोरंजन मुलांचे; नाते जडेल प्रभुशी तयाचे - साने गुरुजी
*संकलक :- बालाजी चौधरी, लातूर*
7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*मनोरंजन*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 आराध्या अनालदास, नांदेड
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*
"चमकोगिरी "
सार्वजनिक पैसा वापरून
काही उदोउदो करतात
स्वतःच्याच नजरेत
मोठे हिरो ठरतात
चमकोगिरी करण्यात
काही मानतात धन्यता
चमकोगिरी विना
करमत नाही अन्यथा
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷
*" विचार धन "*
आपल्या समृद्ध भक्तिपरंपरेतील अनेकानेक संतमंडळी ज्या भक्तिची आपेक्षा करतात, ती भक्ति निष्काम प्रकारची होय. जेव्हा व्यक्ति ईश्वराच्या चिंतनात मग्न होऊन आपले दैनंदिन व्यवहार करीत राहते, त्यावेळी तीला अमुक एक अशा कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नसते. त्यामुळे मग ख-या अर्थाने असे लोक ईश्वराच्या निकट पोहचतात. न मागताही त्यांना ईश्वर सर्वकाही प्रदान करतो, असे अनुभवाने संत सांगतात. यावरून असे लक्षात येते की भक्तिचे जे महत्व आहे ते मुळात भजन-पुजनात नसून भक्ताच्या 'भावात' आहे.
जेव्हा मनुष्य निष्काम भक्ति करतो, त्याचे मन त्याच्या आराध्याकडे एकरूप करतो, त्यावेळी ईश्वर हे साध्य बनते. ईश्वराची प्राप्ती व्हावी हेच उद्दिष्ट निष्काम भक्तित असते. यामुळेच बहुधा विविध उपचार आणि कर्मकांड याहूनही भाव महत्वाचा. देव फक्त भावाचा भुकेला आहे,
असे तुकोबा म्हणतात--
देव भावाचा भुकेला,
दास सेवकाचा झाला ॥
पहा महिमा आवडीची,
फळे खाय भिल्लिणीची ॥
॥ रामकृष्णहरी ॥
🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷
========***********=========
*आजची लिंक*
*मानवतेची शिकवण देणारे साने गुरुजी*
http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/sane-guruji.html
*साने गुरुजी जयंती निमित्त लेख*
========***********=======
*आजची बोधकथा*
*लालसेपायी जीव गेला*
जय आणि विजय यांच्यात घनिष्ट मैत्री होती. दोघेही पट्टीचे पोहणारे होते. नदीच्या पाण्यात भरपूर मस्ती केली. तितक्यात स्थानिक प्रशासनाकडून बंधा-याकडून पाणी सोडण्यात येत असल्याची सूचना देण्यात आली. त्यामुळे दोघेही नदीच्या बाहेर आले. जेव्हा बंधा-यातील पाणी सोडण्यात आले तेव्हा नदीला पूर आल्यासारखी स्थिती निर्माण झाली. जय आणि विजय सुरक्षित स्थळी थांबले होते. नदीच्या पाण्याचा ओघ पाहत असतानाच नदीच्या प्रवाहात एक घोंगडी तरंगत येत असल्याचे दोघांच्याही दृष्टीस पडतील. विजयला ती घोंगडी ओढून आणावीशी वाटली. जयने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु विजयने तोपर्यंत पाण्यात उडी मारली होती. तो घोंगडीजवळ गेला आणि तिला ओढत असतानाच त्याचे संतुलन बिघडले. विजय जितका जोम लावून किना-यावर येण्याचा प्रयत्न करत असतानाच पाण्यात उठणा-या लाटा त्याला दूर लोटत असत. मित्र असा संकटात सापडलेला पाहून जय ओरडला,''अरे मित्रा, घोंगडी सोड आणि परत निघून ये'' पण विजय म्हणाला,'' अरे जय मी घोंगडी सोडण्याचा खूप प्रयत्न करतो आहे पण घोंगडीनेच मला धरून ठेवले आहे.'' जयला कळून चुकले की विजयला त्या घोंगडीची लालसा निर्माण झाली आहे. विजयने घोंगडीसह किना-यावर येण्याचा खूप प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. शेवटी तो पाण्यात मृत्युमुखी म्हणतात.
तात्पर्य- कोणत्याही प्रकारची लालसा प्रसंगी आपल्या जीवाशी खेळू शकते.
वर्तमानपत्रातून संग्रहित
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********========
Comments
Post a Comment