*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 27/12/2016 वार - मंगळवार
========***********=========
*📆 . . दिनविशेष . . 📆*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💥1833 राजाराम मोहन यांचे निधन
💥 1911 कलकत्ता येथे राष्ट्रगीताचे पहिले गायन
💥 1936 जळगाव जिल्ह्यातील फेजपूर येथे खेड्यातील पहिले काँग्रेसचे अधिवेशन
💥 1904 अंताजी दामोधर काळे यांनी पैसा फंडाची कल्पना मांडली
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ आम्ही केवळ सत्ता मिळवण्यासाठी राजकारण करत नाही. तर समाज घडवण्यासाठी राजकारण करतो - राजनाथ सिंग
2⃣ पाकिस्तानने मुक्त केलेल्या 220 भारतीय मच्छिमारांना अटारी येथील वाघा बॉर्डर येथून भारतात आणण्यात आले.
3⃣ शेतकऱ्यांना 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2016 या कालावधीतील कर्जाचा हप्ता भरण्यासाठी 60 दिवसांचा अतिरिक्त अवधी देण्याचा आरबीआयचा निर्णय
4⃣ थंडीच्या प्रकोपामुळे 27 आणि 28 डिसेंबरला उत्तर प्रदेशमधील शाळा, महाविद्यालये राहणार बंद
5⃣ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या हस्ते ट्रासफॉर्म महाराष्ट्र संकेतस्थळाचे उद्घाटन
6⃣ पाच हजार किमीपर्यंतच्या लक्ष्याला भेदण्याची क्षमता असणाऱ्या अग्नि ५ या अण्वस्त्रवाहू आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
7⃣ हरियाणाला 5 विकेट्सनी नमवून झारखंड उपांत्य फेरीत. रणजी करंडक स्पर्धेत झारखंडने पहिल्यांदाच मारली उपांत्य फेरीत मजल.
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
अहंकार सर्व विनाशाला कारणीभुत ठरतो.म्हणून अहंकाराचा त्याग करावा
*संकलक :- बालाजी चौधरी, लातूर*
7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*अंहकार*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 पूजा बागुल, नाशिक
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*
"अपराध "
दुध पोळालं की माणूस
ताकही फुकून पितो
नको त्या गोष्टींची मग
नको तेवढी काळजी घेतो
काही म्हणा झालेल्या चूकीची
मनात कायम फिती रहाते
नको म्हटले तरी अपराधाची
पुन्हा पुन्हा आठवण होते
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🎯 वि चा र वे ध.....✍🏻
-------------------------
जात्यामधले दाणे जात्यामध्ये जाण्यासाठी कधीच माघार घेत नाहीत. कारण त्यांना माहित असते की,आज जरी आपण वाचलो तरी उद्या आपल्यावर वेळ येणारच आहे. दुःख बाळगण्याचे काही कारण नाही. उलट आपल्यामुळे इतरांचा जीव वाचतो म्हणजे आपल्याने इतरांना जीवदान मिळते यापेक्षा आपल्या जीवनात महत्वाचे कार्य कोणते ?
असा विचार आपणही केला तर आपल्याही जीवनाचे सार्थकच होईल.
- व्यंकटेश काटकर,नांदेड.
भ्रमण..9421839590.
🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿
========***********=========
*आजची लिंक*
*जीवन सुंदर आहे.*
http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/blog-post_26.html
========***********=======
*आजची बोधकथा*
*ओळख*
खूप दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, दहा मुलांची एकमेकांशी अतिशय चांगली मैत्री होती. ते सर्वजण एकत्र राहत होते व एकत्रच खात, पित व बहुतांश वेळ सोबतच राहत होते. एकदा त्यांनी सर्वांनी मिळून एकत्र प्रवासाचा बेत ठरविला. ठिकाणही ठरले, सगळेजण आपापल्या वेगाने प्रवास करत होते. कोणी वेगाने पुढे जात होता तर कोणी संथ गतीने पुढे जात होता. मागे-पुढे जात होते पण ठिकाण ठरलेले असल्याने सगळे जण मुक्कामी पोहोचले. सगळे तेथे पोहोचल्यावर तेव्हा त्यांनी विचार केला आपला ग्रुप तरी मोजून घ्यावा. न जाणो कोणी तरी मागे तर राहिला नसेल. एका मुलाने सगळ्यांना रांगेमध्ये उभे करून मोजण्यास सुरुवात केली. त्याने मोजले व म्हणाला,''आपण तर नऊच जण आहोत. मग दहावा जण कुठे गेला'' दुसरा मुलगा म्हणाला थांब मी मोजतो. त्यानेही मोजले तर नऊच जण निघाले. सगळ्यांच्या चेह-यावर उदासी निर्माण झाली. कारण एकजण कुणीतरी त्यांच्यातून हरवला गेला होता व आता तो त्यांना कधीच भेटणार नव्हता. सगळे मलूल चेहरा करून शांतपणे बसून राहिले. त्यांना अन्नपाणी घेण्याचेही सुचेना इतक्यात तेथून एक महात्मा जात होते. त्याने या उदास बसलेल्या मुलांना पाहिले व त्यांना त्यांची दया आली. त्यांनी मुलांना उदासीचे कारण विचारले असता मुलांनी एकजण हरवला असल्याचे सांगितले. त्या महात्म्याला त्यांची अडचण समजली व ते म्हणाले, मी तुम्हाला तुमचा हरवलेला मित्र शोधून देतो. त्याने सर्वांना रांगेत उभे करून मोजले तेव्हा ते दहाजण होते. त्या मुलांना त्यांचा दहावा मित्र सापडला होता. त्यांनी त्या महात्म्याचे आभार मानले व दहावा मित्र कसा काय शोधला हे विचारले असता महात्मा म्हणाले,'' अरे मित्रांनो तुम्ही तुमच्यापासून कधी मोजायची सुरुवातच केली नाही. तुम्ही कायम दुस-यापासून मोजायची सुरुवात करत असल्याने तुम्हाला तुमचे अस्तित्वच कधी जाणवले नाही व यामुळे तुमचा एक मित्र म्हणजे तुम्ही स्वत:लाच मुकत गेलात. हा हिशेब तुमच्या लक्षात न आल्याने तुम्ही जगातला एक सर्वोच्च मित्र गमावित होता.''
तात्पर्य : आपणही स्वत:ला विसरून दुस-याकडेच लक्ष देतो. याच कारणामुळे जग स्पष्ट दिसत नाही. प्रथमत: आपण स्वत:ला ओळखले पाहिजे मग जगाची आपोआपच ओळख होते.
वर्तमानपत्रातून संग्रहित
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment