*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 12/02/2017 वार - रविवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛१९८८- बुध्दीबळपटू विश्वनाथ आनंद यांनी याच दिवशी नवा विक्रम केला
⌛१९२८- सरदार वल्लभाई पटेल यांनी बार्डोलिच्या सत्याग्रहाचा प्रारंभ केला.
💥जन्म :-
⌛१७४२- पेशवाईतील थोर मुत्सुद्दी नाना फ़डणवीस यांचा जन्म
⌛१८०९- चार्लस रॉबर्ट अर्वीन यांचा जन्म
⌛१८८९- सत्येंद्रनाथ दत्त यांचा जन्म
💥 मृत्यू :-
⌛१७९४- मराठेशाहीतील एक भक्कम बुरुज महादजी शिंदे यांचे निधन
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान संपले.
2⃣ कारगिलसह संपूर्ण काश्मीर खोऱ्यात रात्रीचे तापमान आणखी घसरून गोठणबिंदूच्या खाली
3⃣ महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्याला महापालिकेत नोकरी देणार उद्धव ठाकरे
4⃣ नागपूरच्या प्रचार सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अंगावर शाईहल्ला.
5⃣ सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड येथे पाच वर्षांच्या बालकावर मोकाट कुत्र्यांचा हल्ला, मुलगा गंभीर जखमी, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू.
6⃣ बांगलादेशविरोधात 204 धावांची जबरदस्त खेळी करणा-या कर्णधार विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव
7⃣ भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी सामन्यात तिस-या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा बांगलादेशने 6 विकेट गमावत केल्या 322 धावा, भारताला कडवी झुंज.
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
" पापी माणसे तोंडानं बळकट असतात, पण अंतःकरणाने दुबळी असतात."
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*अंतःकरण*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 विजयकुमार पवारे, वाहक, परिवहन मंडळ
👤 सुनील कवडे, कुपटी ता. माहूर
👤 अशोक शिलेवाड, येवती
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
"पाहणारे "
लोक हुशार आहेत
सर्वांचच खातात
ज्याचे खाल्ले त्याचे
थोडे गुण गातात
त्यातले काही असतात
फक्त गुणगान गाणारे
काही असतात माञ
काय चाललंय पाहणारे
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*आजचा*
🔱 ⚜ *॥ विचार धन ॥* ⚜ 🔱
*स्वास्थ्य टिकविण्यासाठी आणि चित्ताच्या स्वास्थ्यासाठी आपल्याला निसर्गाकडून 'ध्यानस्थ' होणे शिकावे लागेल. एकतानता आणि अंत:करणाची तन्मयता यावर भर द्यायला निसर्ग शिकवितो. त्यामुळे आपले जगणे-वागणे आनंददायी होते. अगदी साधी गोष्ट, आपण आपल्या अंगणात किंवा टेरेसमध्ये छोटी बाग विकसित केली, तर तिचा बहर पाहून एक आंतरिक समाधान वाटते. या समाधानासाठीच माणूस आयुष्यभर झटतो व झगडतो. ते मिळाले नाही की, मग हाॅस्पिटलच्या वा-या ! त्या तशा वाढू नये म्हणून चांगल्या गोष्टी आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यात निसर्ग सहवास महत्वाचा आहे.*
*आपल्याकडे जी ऋषीमुनींची परंपरा आहे ते सगळे अरण्यात राहत. त्यांची तपश्चर्या आणि निसर्गाधीन जगणे त्यांच्या आयुर्मानावरही परिणाम करते. त्यामुळे त्याचा शोध-बोध घेणे आपले कर्तव्य आहे. विकेण्डला निसर्गरम्य स्थळी राहणे, म्हणजे निसर्गाकडून शिकणे नव्हे, ते केवळ मनोरंजन असते. त्यातून साधना घडत नाही. त्यासाठी ज्ञान लागते. त्यामुळे निसर्गाशी जवळीक जरूर केलीच पाहिजे. तो स्वास्थ्यावरचा आणि स्वस्थ चित्तावरचा 'अनमोल' उपाय आहे.*
🔅☀ *॥ रामकृष्णहरी ॥* ☀🔅
🔹🔹🔹🔹🔹🔹
*--संजय नलावडे, चांदिवली,मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
🎯 विचारवेध...........✍🏻
〰〰〰〰〰〰〰〰
झरा हा जीवात जीव असेपर्यंत सतत वाहतो.
वाहत वाहत सा-या जीवांना पाणी पाजवत जातो.त्याचा जन्मच आहे सा-यांची तहान भागवणे.
तो कुणालाही नकार देत नाही.माझ्यामुळे जर कुणाच्या जीवाला शांतता मिळत असेल तर मला त्याच्यापेक्षाही अधिक समाधान आहे.
त्यापेक्षा मला अधिक काही नको.तो परमेश्वराला म्हणतो " परमेश्वरा, सागर बनवण्यापेक्षा मला झराच बनव.त्यातच मला आनंद आहे. कधीही मला गर्व स्पर्श करु देऊ नकोस.
फक्त एवढेच कर,सतत प्रवाह माझ्या जीवनात राहू दे. एवढीच माझी तुला प्रार्थना."
आपण लहान होऊनही काहीनाकाही करण्याची प्रेरणा आपल्यामध्ये निर्माण व्हावी अशी अपेक्षा झ-याप्रमाणे ठेवावी आणि निरंतर परोपकारासाठी प्रयत्नशील राहावे.
- व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद.9421839590.
💠🌷💠🌷💠🌷💠🌷💠🌷💠🌷
----------------------------------------------------
*वपुर्झा*
प्रॉब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतचं. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं या तिन्ही गोष्टीपलिकडचा प्रॉब्लेम अस्तित्वात नसतो.
~ वपु काळे | वपुर्झा
*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
मी स्वतः शेतात काम करीत असतांनाची ही घटना अर्थात एक स्वानुभवच आहे. आमच्या शेताच्या बांधावर भलामोठा जाडजूड व लांब लाकडाचा ओंडका पडलेला होता. मी विचार केला,की याला आपण पेटवू या. त्यानुसार मी शेतातील काडीकचरा वेचून व काड्या काटक्या जमवून त्या लाकडाच्या आजूबाजूला लावल्या व पेटविण्याचा प्रयत्न केला.पण झाले काय, की ... तो सर्व कचरा काड्याकाटक्या जळून गेल्या.मात्र ते लाकूड काही जळाले नाही. मी तोच प्रयत्न अधिक कचरा जमवून पुन्हा करुन पाहिला. यावेळेसही सगळा कचरा जळून राख झाली पण मोठे लाकूड मात्र होते तसेच कायम राहिले. मी विचार करु लागलो, आजुबाजूचे सर्व काही जळून जाते पण या लाकडाला मात्र आगीचा स्पर्शही होत नाही. असे का ? तो दिवस असाच गेला.मी घरी परत गेलो.
दुसऱ्या दिवशी मात्र मी सोबत एक कुऱ्हाड नेली.ते मोठे लाकूड अत्यंत भक्कम व मजबूत होते.ते कुऱ्हाडीला सुद्धा दाद देत नव्हते.मी घाव घालून थकलो पण त्यावरुन कुऱ्हाड उधळून येत असे. प्रसंगी एखादी बारीकशी खपली निघे पण लाकूड काही दाद देईना.मी थकलो आणि विश्रांतीसाठी थांबलो.झाडाच्या बुंध्याला पाठ टेकवून पडलो होतो तरी नजर त्या लाकडाकडेच होती.बारकाईने मी पहात होतो, त्या लाकडाला कुठे बारीकसा तडा वगैरे दिसतो का?शेवटी माझ्या शोधक नजरेला एक बारीकसा तडा दिसला.मी पाणी पिऊन ताजातवाना झालो.ऊठलो आणि कुऱ्हाड हातात घेतली.त्या तड्याचा वेध घेत सारखे घाव घालू लागलो. आता मात्र मला बऱ्यापैकी यश मिळत होते.लाकडाच्या ढलप्या निघत होत्या.शक्य तेवढ्या व गरजेपुरत्या ढलप्या मी काढल्या.त्या सर्व एकत्र गोळा करुन लाकडाच्या आजुबाजूला नीट रचल्या.परत थोडे गवत आणि काडीकचराही लावला.खिशातून काड्यापेटी काढली आणि दिले पेटवून.आता मात्र मला निराश व्हायची वेळ आली नाही.थोड्याच वेळात काड्या आणि स्वतःच्या ढलप्यांसोबत ते लाकूड पेटू लागले.थोड्याच वेळात त्या संपूर्ण लाकडाला आगीने वेढले होते.एव्हाना संध्याकाळ होत आली होती.माझीही पावले गावाच्या व घराच्या दिशेने वळली.मी घरी परततांना सारखा मागे मागेच वळून पहात होतो.लाकडाने चांगलाच पेट घेतला होता. मला खात्री वाटू लागली,की रात्रीतून लाकूड जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा शेतात येवून पाहिले, .... तो भला मोठ्ठा लाकडाचा ओंडका जळून त्याची राख वाऱ्याने उडत होती.
मी जवळच झाडाखाली बसून विचार करु लागलो.हवा तेवढा काडीकचरा लावून मी जेंव्हा ते लाकूड जाळण्याचा प्रयत्न करीत होतो,त्या लाकडाला आगीचा स्पर्शही होत नव्हता.पण जेव्हा कुऱ्हाडीच्या साह्याने त्याच्याच ढलप्या त्याच्यापासून वेगळ्या करुन त्यांच्याच मदतीने पेटविले तेंव्हा मात्र लाकूड जळून भस्मसात झाले.
मला वाटते एखादा समाज,संघटना .... यांचेही असेच तर आहे.जोपर्यंत अभंग,एकसंघ आणि आपल्या आस्तित्वाची काळजी घेत राहतात तोपर्यंत त्यांचे कोणीही काहीच वाकडे करु शकत नाही;हेच खरे.पण एकदा का फूट पडली.शक्ति विभागली व फंदफितुरी निर्माण झाली की भक्कम शक्तिशाली दिसणारा समाज किंवा संघटना नष्ट होण्यास वेळ लागत नाही.
*तात्पर्य* -
एकीत जय,बेकीत क्षय.
United we stand, divided we fall.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◑◎✹★✹🔅✹★✹◑◎●•
*✍संकलन ✍*
*साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
─┅━━═▣🔻▣═━━┅─
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment