फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दिनांक 13 फेब्रुवारी 2017

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 13/02/2017 वार - सोमवार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
      📆 . . *दिनविशेष . . 📆*

⌛१९८४- भारतातील पहिले होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजची स्थापना
💥 जन्म :-
⌛१८७९ - सरोजिनी नायडू यांचा जन्मदिन
⌛१९२२ - गायक पं भीमसेन जोशी यांचा जन्म
💥 मृत्यू :-
⌛१९१४- ’लल्फ़ान्सो बर्टिलान’ या मानववंश शास्त्रज्ञाचे निधन
⌛१९०१- शरीर शास्त्रज्ञ जयवंतसिंग यांचे निधन

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नांदेड जिल्ह्यातील नरसी येथे सुरु असलेल्या सभेत छावा कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणच्या दिल्या घोषणा.
2⃣ तुम्ही सत्य पाहत आहात, आम्ही कुठल्याच आमदारावर जबरदस्ती केली नाही, एका कुटुंबाप्रमाणे आम्ही राहतो आहोत शशिकला यांचे प्रतिपादन
3⃣ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दक्षिण कोकणातील काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कुणकेश्वर यात्रेचे नियोजन अंतिम टप्प्यात, महाशिवरात्रीनिमित्त २४ पासून यात्रोत्सव, लाखो भाविक राहतात उपस्थित
4⃣ राज्यातील 10 महापालिकांच्या 1 हजार 268 जागांसाठी 9 हजार 199 उमेदवार निवडणूक रिंगणात
5⃣ कळव्याचा चेहरा बदलायचा असल्यास ठाण्यात परिवर्तन आवश्यक राष्ट्रवादीचे शरद पवार
6⃣ अंध T-20 मध्ये पाकिस्तानला 9 विकेट्सनं हरवून भारतानं जिंकला खिताब
7⃣ चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा बांगलादेश १०३/३ जिंकण्यासाठी अजूनही ३५६ धावांची आवश्यकता
*ता. क. - पुण्यातील सर फाउंडेशन आयोजित पाचवी आणि आठवीसाठी स्कॉलरशिपची राज्यव्यापी सराव परीक्षा महाएक्साम (MAHAEXAM) यशस्वीरित्या आणि उत्साहात संपन्न*

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
" प्रेमामुळे अडचणी येतात हे जरी मान्य केलं तरी त्याच्यामुळे खरी ऊर्जा मिळते आणि हा त्याचा चांगला भाग आहे."
            _______ व्हिन्सेन्ट फान घो

*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
                  8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
             *ऊर्जा*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤 देवीसिंग ठाकूर, धर्माबाद
👤 नागनाथ भद्रे, धर्माबाद
👤 अशोक पाटील, धर्माबाद

*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*

     " वाद "

प्रत्येकच ठिकाणी
अंतर्गत वाद आहे
कुठे प्रतिबंध तर
कुठे प्रतिसाद आहे

हा अंतर्गत वाद
टोकाला जाऊ नये
लुटूपुटूचा वाद
डोकेदुखी होऊ नये

  शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
  ----------------------------------------------------
*आजचा*
⛳ *.........॥ विचार धन ॥.........*⛳

*सिकंदर 'जगज्जेता' ठरला, तरीही त्याची अभिलाषा विराम पावली नव्हती, तो मनाच्या घालमेलीत फे-या मारत होता. सारी पृथ्वी जिंकून मी 'जगज्जेता' आणि महान 'सेनापती' ठरलो. मी जेता आहे; पण आता मी जिंकू काय ? त्याचा अहंकार जागा होता. त्याचं मन दु:खी झालं.*

*सारी छावणी निद्रेच्या अधीन होती. पण या विषण्ण अवस्थेत त्याचा दु:खावेग अनावर झाला अन् तो ढसढसा रडू लागला व ओरडू लागला आता मी जिंकू काय ? मला जिंकण्यासाठी काहीच उरले नाही.*

*आवाज ऐकून एक वृद्ध सैनिक जागा झाला व म्हणाला.."शहंशाह जिंकायला अजून एक गोष्ट बाकी आहे. ती अत्यंत अवघड गोष्ट म्हणजे माणसाचं मन ! ते जिंकलत तर आपण ख-या अर्थाने 'जगज्जेता' व्हाल !"*

*" ज्या दिवशी माणूस स्वत:चं मन जिंकेल त्यादिवशी तो खरा जगज्जेता !"*
          
           🎋 *॥ रामकृष्णहरी ॥* 🎋
            🌹🌹🌹🌹🌹🌹
    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
🎯 विचारवेध...........✍🏻
++++++++++++++++++++

आनंद हा आनंदच असतो.
आनंदाला कोणीही सहज स्वीकारतो.त्याचा कोणीही तिरस्कार करत नाही.जेथे सुख,समाधान,शांती आहे तेथे आनंद आनंदाने नांदत असतो.पण जेथे वाद,
नैराश्य,दुःख,अस्थिर मन आहे तेथे आनंद संचार करत नाही.आनंदाला जवळ करायचे असेल तर मनातून त्याला हसत मुखाने व कोणत्याही कठीन परिस्थितीत स्थीर मनाने स्वीकारावे.इतरांच्या आनंदात सहभागी होऊन त्यात आनंद मिळवता येतो.त्यासाठी आपणही आनंद प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असायला पाहिजे.कारण आनंद हा चांगल्या प्रयत्नाने आणि सातत्याने केलेल्या कामात व मनाच्या  समाधानात मिळत असतो.तो कुणालाही विकत घेता येत नाही.

- व्यंकटेश काटकर,नांदेड.
  संवाद.9421839590.

🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃
----------------------------------------------------
~~~~~  *👬 मैत्री 👬*  ~~~~~~

मैत्री ही कापड्यातील धाग्यासारखे आहे. एका मित्राने आपले जीवन परिपूर्ण होतच नाही. अनेक धाग्यासारखे जीवनात अनेक मित्र असतात आणि त्याची आवश्यकता देखील पदोपदी जाणवत राहते. बालपणीच्या मित्रांपासून जी मैत्री चालू होते ते महाविद्यालयीन जीवनापर्यंत जाऊन पोहोचते. या सर्व कार्यकाळात असलेले मित्र सुख आणि दुःखाच्या प्रसंगी अधुनमधून जीवनात डोकावत असतात. नोकरीच्या ठिकाणी सुद्धा मैत्री होते पण ती काही ठिकाणी तात्पुरते बनते तर काही ठिकाणी ही मैत्री गट्ट दिसून येते. संकट काळात जो मदतीला धावून येतो तोच खरा मित्र असे म्हटले जाते. त्यासाठी जीवनात संकट यावे लागते हे ही सत्य आहे. आपल्या जीवनात संकटेच आली नाहीत तर खरी मैत्री देखील कळणार नाही.

*मैत्री असावी जीवाभावाची*
*नसाव्यात कोरड्या शपथा*
*क्षणोक्षणी आठवावे आपुल्या*
*मैत्रीच्या आठवूणी कथा*

- नासा @ 26
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
          
          *❃  एकाग्रता  ❃*
      
   *एकदा एक स्वामीजी काही मुलांचे निरीक्षण करत होते*. ती मुले पुलावर उभे राहून नदीवर तरंगत जाणार्‍या अंड्याच्या टरफलावर बंदुकीने नेम साधण्याचा प्रयत्न करत होती. पाण्यामुळे ती टरफले वर-खाली होत होती. मुलांना त्यांच्यापैकी एकही टरफलावर नेम धरता आला नाही. त्यांनी अनेक वेळेला बंदूक झाडली पण प्रत्येकवेळी त्यांचा नेम चुकत राहिला. त्यांच्याकडे बराच वेळ स्वामीजींचे लक्ष होते. मुलेही हे पाहत होती. मुलांनी स्वामीजींना म्हटले," तुम्ही नुसतेच आमच्याकडे काय पाहत आहात? का आम्हाला नेम धरता येत नाही असे तुम्हाला वाटते? आणि असे असेल तर तुम्ही नेम धरून ती टरफले फोडून दाखवा. तुम्हाला जर असे वाटत असेल की तुम्हाला आमच्यापेक्षा अधिक चांगले जमते असे वाटते का?" स्वामीजी हसले आणि म्हणाले," मी प्रयत्न करून पाहतो." मुले म्हणाली," तुम्हाला वाटते तितके ते सोपे नाहीये." स्वामीजींनी बंदूक हातामध्ये घेतली आणि त्या अंड्याच्या टरफलावर नेम धरला, काही मिनिटे निश्चल राहिले, मग त्यांनी बंदूक चालवली, त्यांनी बारावेळा गोळ्या झाडल्या आणि बारावेळेला अंड्यांची टरफले उडविण्यात स्वामीजींना यश आले. त्या मुलांना फारच आश्चर्य वाटले,"एखादा माणूस पाण्यातील वाहणार्‍या अंड्याच्या टरफलावर इतका अचूक कसा नेम साधू शकतो?" असा प्रश्न त्यांना पडला. स्वामीजींनी मुलांच्या मनातील हे ओळखले, त्‍यांना ती मुले आवडली होती. ते म्‍हणाले,’’ जे काही तुम्‍ही करत होता त्‍यावर तुमचं मन एकाग्र करा. नेमबाजी करा किंवा अन्‍य काही. तुमचं लक्ष फक्त लक्ष्‍यावरच पाहिजे. तुमचा नेम कधीच चुकणार नाही. एकाग्रतेने बरेच काही साध्‍य करता येते. अवघड वाटणा-या गोष्टीसुद्धा या एकाग्रतेने सहजसाध्‍य होतात.’’ मुले स्‍वामींजींपुढे नतमस्‍तक झाली.
         *_🌀तात्पर्य_ :~*
ध्येय प्राप्ती साठी एकाग्रता फार महत्वाची आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●•
            *✍�संकलन ✍�*
              *साई पाटील*,
  *श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
                 धर्माबाद.
─┅━━═▣🔻▣═━━┅─
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Comments