फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दिनांक 20 फेब्रुवारी 2017

सकाळच्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर पहिली पोस्ट

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 20/02/2017 वार - सोमवार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
      📆 . . *दिनविशेष . . 📆*

⌛१९८७- मिझोरम व अरुणाचल या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला
⌛१९८८- गीता सेठीने राष्ट्रीय बिलियर्ड स्पर्धा जिंकली
💥 मृत्यू :-
⌛१७०७- औरंगजेबाचे अहमदनगर येथे निधन
⌛१९६५- वासुदेव गणेश रानडे यांचे निधन
⌛ बिपिनचंद्र पाल पुण्यतिथी

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ नागालँडचे मुख्यमंत्री टी. आर. जेलियांग यांनी दिला राजीनामा
2⃣ सर्व जाती-धर्माला न्याय देणारे, रयतेवरील अन्याय दूर करणारे लोकशासन शिवरायांनी दिले', असे गौरवोद्गार शिवजयंती निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले शिवनेरीवर काढले.
3⃣ दहा मनपा आणि अकरा जिल्हा परिषद निवडणुकासाठी काल प्रचार थंडावल्या, उद्या 21 तारखेला मतदान होणार असून, 23 फेब्रुवारी म्हणजेच गुरुवारी मतमोजणी केली जाणार आहे.
4⃣ मुंबईत पारा 38.8 अंशांवर, गेल्या 10 वर्षांतील फेब्रुवारी महिन्यामधील दुसऱ्या क्रमांकाचं उच्चांकी तापमान
5⃣ अहमदनगर दारुकांडात आणखी एक बळी, बनावट दारुमुळे आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू, उद्धव आव्हाड यांचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू
6⃣ आयपीएल 10 च्या सत्रासाठी पुणे सुपरजायंट्स संघाने धोनीच्या जागी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथची केली नियुक्ती करण्यात
7⃣ शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या दुस-या ट्वेंटी-20 लढतीत श्रीलंकेने ऑस्ट्रेलियावर दोन गडी राखून मात केली, या विजया सोबत मालिका ही जिंकली

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
" सतर्कतेने संधीची वाट पाहणे, साहसाने आणि काैशल्याने संधी प्राप्त करणे, शक्ती आणि दृढतापुर्वक संधीचा फायदा घेऊन कार्य यशस्वी करणे, हेच मनुष्याला यशस्वी करणारे गुण ! "

*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
                  8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
             *यशस्वी*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤डुमलवाड शंकर राजेन्ना, स.शि.
   प्रा.शा.शिरूर ता.उमरी,जि.नांदेड.
👤 अनाम मैनुद्दीन शेख, नांदेड
👤 शिरीष गिरी, सहशिक्षक, धारूर
👤 दिलीप लिंगमपल्ले, धर्माबाद

*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*

     " जागा  "

माणूस चूकला की मग
लोक जागा दाखवतात
केवढा ही मोठा असला
तरी त्याला वाकवतात

चूक होणार नाही असं
माणसाने राहिले पाहिजे
शब्द कसे पाळता येतील
हे आधी पाहिले पाहिजे

     शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
  ----------------------------------------------------
*आजचा*
🔱~🔱 *॥ विचार धन ॥* 🔱~🔱

*आपण स्वत:च्या मनाशी कधीतरी संवाद साधला पाहिजे. बाहेरच्यांशी आपण  खूप बोलतो. नको तेवढा वेळ घालवतो, पण त्यात 'स्वसंवाद' साधायला विसरतो. हा विसर आयुष्याच्या शेवटाला आपल्याला त्रासदायक ठरू शकतो. आपण अनेक गोष्टी सहज करू शकलो असतो, क्षमता असूनही आपण एकही शाश्वत काम उभे करू शकलो नाही, ही जाणीव नैराश्यकडे नेणारी असते.*
       *" तुका म्हणे होय मनासि संवाद,*
           *आपुलाचि वाद, आपणाशी।"*
*असा वाद आता संपला आहे; कारण वाद होण्यासाठी मुळात संवाद व्हावा लागतो. त्यासाठी एकदा स्वत:त डोकावून पाहावे लागते. एकदातरी स्वत:ला कडकडून भेटायला हवे. आपले नेमके उलटे होते.*
             
              *हजारों मैंफिले हो,*
                *लाखो मेले हो,*
               *खुदसे ना मिलो,*
             *तो बिलकुल अकेले हो ॥*

*हे असे एकटेपण कुणालाही, कधीही येता कामा नये. समाजात अनेकांना 'एकांत' आणि 'एकटेपणा' यातला फरक कळत नाही. एकांत साधना, अभ्यास या विषयाशी निगडीत आहे, तर एकटेपणा हा नकारात्मक आहे. एकांताचे अनुमान 'सुखावह' तर एकटेपणाचे 'भयावह' असतात....!*

      🔱🔱 *॥ रामकृष्णहरी ॥*🔱🔱
      *- संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
🎯 विचारवेध...........✍🏻
--------------------------

या जगात कोणतीही वस्तू किंवा कोणताही जीव कायमस्वरुपी या जगात राहण्यासाठी किंवा टिकण्यासाठी आलेला  नाही. एखादी वस्तू चांगली आहे तोपर्यंत त्याचा वापर करतो आणि काम संपले की त्याला खराब झाली म्हणून अडगळीला टाकून देतो कारण त्याची किंमत शून्य होते. तसे मानवी जीवाचे नाही. मानवी जीवाचे वय वाढत जाते त्याबरोबरच मूल्यही (जगण्याचे महत्व) अधिकाधिक वाढत असते.जसजसे वय वाढत जाईल आणि तसे तसे अनुभवाने समृद्ध होत जाईल.जगण्याचे मूल्यही कळायला लागेल.पण त्या मिळालेल्या चांगल्या  अनुभवाचे पडसाद मागे राहणा-यावर पडले तर तुमच्या पश्चात ते अजरामरच राहणार आहेत.कारण आपणही
कधी ना कधी या जगातून निघूनच जाणार आहोत.
मग आपण जाण्याचे दुःख बाळगायचे नाही तर आपण इतरांना काहीतरी चांगले देऊन गेलो याचे समाधान वाटून जीवन समर्पित करावे.यातच खरे जीवन जगण्याचे सार आहे.

- व्यंकटेश काटकर,नांदेड.
  संवाद.9421839590.

🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃
----------------------------------------------------
*वपुर्झा*

काही काही शब्द, वाक्यं, विधानं फार भयंकर असतात. ती मोघम असतात, पण गैरसमज पसरवण्याची त्या मोघम वाक्यांची ताकद, साथीचा रोग पसरवणाऱ्या जंतूंपेक्षा अफाट असते.
~ वपु काळे | ऐक सखे

*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
      
        " एका जंगलात एक सिंह त्याच्या मित्रांसोबत राहत होता. एक कावळा, एक कोल्हा आणि एक चित्ता, अन्न मिळवण्यासाठी , पोटासाठी सिंह शिकार करत असे आणि मग तो आणि त्याचे मित्र मनसोक्त भोजन करीत असत.
एक उंट एक दिवस रस्ता चुकतो आणि सिंहाच्या गुहेजवळ पोहंचतो. तो सिंहाला म्हणतो मला मारू नका ! सिंह त्याला म्हणतो ठीक आहे. तू आमच्याबरोबर राहू शकतोस. उंट तिथे आनंदाने राहतो.
एक दिवस, सिंह शिकार करताना जखमी झाला. त्यामुळे तो अशक्त होतो आणि शिकार करणे थांबवतो. कारण त्याला ते शक्य नव्हते. चित्ता आणि कोल्हा सगळ्यांना पुरेल इतकी शिकार करू शकत नव्हते. कधी - कधी ते परत रिकाम्या हातानेच परत येत असत. शिकारी विना जगणे त्यांना खूप कठीण झाले होते.
एका संध्यकाळी , कोल्हा सिंहाकडे जातो आणि म्हणतो, महराज , तुम्ही मला खा आणि आपला जीव वाचवा. सिंह म्हणतो. नाही, मी तुला मारू शकत नाही. नंतर चित्ता येतो आणि कोल्हासारखीच सिंहाला विनंती करतो. पण सिंह त्याला खाण्यचे टाळतो.
उंट विचार करतो की, सिंहाचे त्यांचावर प्रेम आहे म्हणूनच त्यांना तो मारणे टाळत आहे. मग त्याच्या मनात असा विचार येतो कि मलाच त्यांनी खाल्ले तर त्यांचे पोट भरेल. आपण त्यांच्यासाठी बळी जाऊ. उंट तोच प्रश्न विचारतो तेव्हा सगळे प्राणी त्याला मारून टाकतात. उंट मूर्ख पणामुळे आपला जीव गमावतो.

*तात्पर्य - आती शहाणा त्याचा बैल रिकामा. "*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
  *श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
                 धर्माबाद.
──┅━━═▣🔻▣═━━┅──
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Comments