फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दिनांक 21 फेब्रुवारी 2017


सकाळच्या सूर्यकिरणा सोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 21/02/2017 वार - मंगळवार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
      📆 . . *दिनविशेष . . 📆*

⌛१९६७- जिनिव्हा येथे नि:शस्त्रीकरण शिखर परिषद याच दिवशी पार
💥 जन्म :-
⌛१८९४- शांतीस्वरुप भटनागर यांचा जन्म
💥 मृत्यू :-
⌛१९१३- सेनापती व बंगालचे क्रांतिकारक वीरेंद्रनाथ यांना याच दिवशी फ़ाशी

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣  देशातील संरक्षण दलाची 14 हजार एकर जमीन अतिक्रमणातून मुक्त करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारने पावले उचलण्याचे दिले निर्देश
2⃣  लिबियाच्या पंतप्रधानांच्या ताफ्यावर त्रिपोलीमध्ये गोळीबार, कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
3⃣ शिवसेनेसोबत पुन्हा युती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत एकत्र यायचं झाल्यास पारदर्शकता हाच अजेंडा, केलं स्पष्ट
4⃣ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात शिवसेना निवडणुक आयोगाकडे करणार तक्रार, प्रचाराची मुदत संपल्यानंतरही मुलाखत दिलाचा आरोप
5⃣ महापालिका आणि जिल्हा परिषद साठी आज मतदान
6⃣ पाकिस्तानचा विस्फोटक फलंदाज शाहीद आफ्रिदीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
7⃣ आयपील लिलाव 2017 इंग्लंडच्या बेन स्टोक्सला 14.50 कोटींची बोली, स्टोक्स रायझिंग पुणे सुपरजायंट्स ताफ्यात.

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*

काळजी करण्यापेक्षा सत्कर्मे केलेली कधीही उत्तम.

*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
                  8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
             *सत्कर्म*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤 विशाल चव्हाण, सहशिक्षक
👤 सचिन मानधनी, धर्माबाद
👤 पियूष मुजळगे, येवती

*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@

    "काळजी "

भाकरी करपू नये
म्हणून फिरवली जाते
आत्मप्रौढी वाढू नये
म्हणून जिरवली जाते

काळजी घेतली नाही तर
लोक काळजी घेतात
अचूक वेळ पाहून
बरोबर झटका देतात

    शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
  ----------------------------------------------------
*आजचा*
⛳  🍁 *॥ विचार धन ॥* 🍁  ⛳

*या जगात आपल्या बुद्धीला पचविता आल्या नाहीत अशा कितीतरी वस्तू आहेत. 'मुलाला आपल्या बापाचे बारसे पाहाणे जसे शक्य नाही,' तसे मी कोण आहे ? हे बुद्धीने ओळखणे शक्य नाही.*

*खरी सत्य वस्तू कल्पना, बुद्धी, आणि तर्क यांच्या पलीकडे आहे. सत्याचा शोध करायचा असेल तर सत्य ज्याने झाकले आहे ती वस्तू दूर करा, म्हणजे 'सत्य' दिसेल. 'सत्य' हे आपल्याला उत्पन्न करता येत नाही; पण उपाधी मात्र उत्पन्न करता येते, उदा. भिती, कल्पना इ.*

*नदीच्या पुलावर उभे राहिले असता पायाला पाण्याचा स्पर्श न लागता देखील, वाहणार्‍या पाण्याची मजा अनुभवता येते; त्याचप्रमाणे देवाचे अस्तित्व ज्याच्या अंतःकरणाला पटले, तो विषयामध्ये राहून देखील, होणार्‍या सुख-दुःखाच्या गोष्टींकडे गंमत म्हणून बघेल आणि त्यापासून स्वतः अलिप्त राहील. सुख हे विषयात नसून आत्म्यात आहे. "आत्मा सुख-रूप आहे."*
        
         🔔 *॥ रामकृष्णहरी ॥* 🔔
         ❤❤❤❤❤❤
    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
🎯 विचारवेध...........✍🏻
_______________________

             मन सुंदर आणि सशक्त असेल तर विचारही सुंदर असतात.ज्यांचे मन आणि विचार सुंदर असतील तर त्यांचे जीवनही जगणे सुंदर असते.ज्यांचे जीवन सुंदर आहे त्यांचे इतरांनाही जुळवून घेऊन जगण्याचे सामर्थ्यही सुंदर असते.
अशी माणसे स्वतःवर आणि इतरांवरही प्रेमाने राज्य करुन जग जिंकू शकतात.खरेच जग जिंकायचे असेल तर वरील गोष्टींना आपल्या जीवनात प्राधान्य द्यावे लागेल.
त्यासाठी आपले मन चांगले आणि चांगले  विचार सातत्याने जीवनात आचरणात आणायला हवेत.त्यासाठी आतापासून आपल्या मनाला चांगल्या विचारांचे इतरांमध्ये असलेले गुण अनुकरण करुन वृद्धिंगत करण्याचा  प्रयत्न केला पाहिजे.

- व्यंकटेश काटकर,नांदेड.
  संवाद.9421839590.

🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃
----------------------------------------------------
*वपुर्झा*

स्वतःला काय हवंय ते स्वत:लाच जेव्हा कळत नसतं तीच परिस्थिती खऱ्या परीक्षेची असते... परीक्षा स्वतःच्या स्वभावाची... परीक्षा स्वभावातल्या धीराची... आणि खऱ्या नात्यांची... चंचलता म्हणजे एक धुरकट दु:ख... जे हवंय ते नाही मिळालं कि दु:ख होतंच... पण नक्की 'काय' नाही मिळालंय म्हणून दु:ख होतंय हे माहित नसेल तर त्याहून जास्त दु:ख होतं... कारण दुखणं माहित असेल तर औषध शोधता येतं... जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना 'आपल्या पायाला तळ लागत नाहीये' हि त्याची खंत असते आणि 'पायाला तळ लागला तर श्वास घेता नाही येणार' हि त्याची व्यथा असते... दोन्हीकडे कोंडीच... खरंतर माणूस दु:खालाही सामोरं जायला तयार होतो... पण दु:ख किती आणि कुठपर्यंत सहन करायचं हे माहित नसणं हेच दु:खातलं दु:खाहून मोठं दुखणं... दु:खातही माणसाला स्थैर्य लागतं...
~ वपु काळे | घर हरवलेली माणसं

*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
          

*आयुष्याची खरी किंमत*

एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला " आयुष्याची खरी  किंमत काय
असते हो? "
आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले " ह्या अगोदर तू ह्या दगडाची
खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये , विकू
नकोस . " सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली .
तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून  म्हणाला - ".या दगडाचा मोबदला म्हणून मी
तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो." नातवाने  आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू
शकत नसल्याबद्दल  त्याची माफी मागितली व निघाला . वाटेत त्याला एक
भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली
- " मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो. "
पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल
त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत
जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या
भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला - " या खड्यासाठी
मी तुम्हाला  दश लक्ष रुपये देऊ शकतो." नातवंडाला फार आश्चर्य वाटले पण
नातवाने  आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल  त्याची माफी
मागितली व निघाला. थोडे पुढे आल्यावर त्याला अतिशय दुर्मिळ रत्न आणि मणी
विकणारे दुकान दिसले. त्याने तो दगड तिथल्या रत्नपारख्यास दाखवला. तो
रत्नपारखी ह्या विषयात अतिशय निष्णात होता.त्याने अलगद तो दगड एका मखमली
कापडावर ठेवला. त्या दगडाच्या अवती भोवती प्रदक्षिणा घालत तो म्हणाला - "
अहो, एवढा अमूल्य दुर्मिळ  अनघड हिरा तुम्ही कुठून बरे आणला? मी माझे
अख्खे दुकान जरी विकले तरी सुध्दा ह्या हिऱ्याची किंमत तुम्हाला देऊ नाही
शकणार ."
आता मात्र नातू अतिशय चकित झाला आणि गोंधळलेल्या मनःस्तिथीत  तो
आजोबांकडे परतला . त्याचे सर्व अनुभव ऐकून आजोबा म्हणाले - "  मला वाटते
फळवाला, भाजीवाला, सराफ आणि रत्नपारखी ह्यांच्या उत्तरावरून तुला
आयुष्याच्या मोलाविषयी कळले असेल. तुम्ही जरी अतिशय दुर्मिळ अमूल्य हिरा
असलात तरी सुध्दा लोक तुमची किंमत त्यांच्या सीमित समजुती, आकलनशक्ती,
हेतू आणि कुवतीनुसारच करणार."
त्यामुळे आयुष्यात स्वतःची किंमत जाणून घेणे सर्वात महत्वाचे असते.
स्वतःचा आदर करा.

*इतरांबरोबर कोण्यात्याही निरर्थक तुलने मध्ये गुंतू नका*.

कारण तुम्ही या विश्वातील एक *अभिनव आणि अद्वितीय निर्मिती* आहेत.

तुमच्या सारखे फक्त तुम्हीच आहात. हीच तुमच्या आयुष्याची खरी किंमत आहे .

*आपल्या सर्वांनाही स्वतःची खरी किंमत कळून स्वतःवर प्रेम करायला शिकू....*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑✹★✹🔅✹★✹◎◑●•
            *✍�संकलन ✍�*
              *साई पाटील*,
  *श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
                 धर्माबाद.
──┅━━═▣🔻▣═━━┅──
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Comments