✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 28/02/2017 वार - मंगळवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
*राष्ट्रीय विज्ञान दिन*
⌛१९३१- राष्ट्रीय विज्ञान दिन डॉ. सी. व्ही. रमण यांनी त्यांचे विकिद्रणाबद्दलचे संशोधन (रामन परिणाम) या दिवशी जाहीर केले . पुढे त्यांना त्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले. म्हणून हा दिवस ’राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून पाळला जातो.
💥मृत्यू :-
⌛१९६३- भारताचे पहिले राष्ट्रपती बाबू राजेंद्रप्रसाद यांचे निधन
⌛कमला नेहरु पुण्यतिथी
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ राज्याचा अर्थसंकल्प 18 मार्चला होणार सादर
2⃣ सैनिकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार प्रशांत परिचारक यांना महिला आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश.
3⃣ जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी व कॉँग्रेस एकत्र, आघाडीबाबत झाला निर्णय.
4⃣ बैलगाडी शर्यतीलाही हिरवा कंदील मिळण्याचे संकेत, कामकाज सल्लागार समितीमध्ये विधेयक आणण्याचे मुख्यमंत्र्यांचे विधी व न्याय विभागाला निर्देश
5⃣ देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी भारती एअरटेलने देशभरात रोमिंग फ्री केल्याची केली घोषणा.
6⃣ आपल्या विविध मागण्यांसाठी युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनच्या (यूएफबीयू) नेतृत्वाखालील संघटनेकडून आज संप
7⃣ न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू एमी सेटर्थवेटने सलग चार सामन्यात शतक करण्याचा केला विक्रम
*ऑस्कर २०१७ विशेष*: सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात वितरकांकडून मोठी चूक. ला ला लॅण्ड नव्हे तर ‘मूनलाइट’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, ला ला लँड चित्रपटातील भूमिकेसाठी एमा स्टोनला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, केसी अॅफ्लेक ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता. 'मँचेस्टर बाय दि सी' चित्रपटातील भूमिकेसाठी मिळाला पुरस्कार.
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
जी माणसं साधी असतात त्यांना कोणत्याही प्रसिद्धीची गरज नसते, त्यांचे नाव त्यांच्या कर्तृत्वाने व कामाने सिद्ध होत असते
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*विज्ञान*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 साईनाथ सुरेश येवतीकर, विजयनगर, नांदेड
👤 निर्मला सोनी, गझलकार, अमरावती
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
*" कळत नाही "*
कौतुक करून आधी
पाठ थोपटवतात
चिमटे काढत लगेच
तेच चापटवतात
थोपटलं की चापटलं
कोणाला कळतं नाही
नेमकं काय चाललंय
माहिती मिळतं नाही
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🌹🌹 शुभेच्छा जाहिरात 🌹🌹*
बारावीची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना FM Buletin Team कडून खुप खुप शुभेच्छा....!
----------------------------------------------------
*आजचा*
🌷~☀ *॥ विचार धन ॥* ☀~🌷
*नोकरी, कौटुंबिक जबाबदारी, सण-उत्सव, आजारपण, मुलांचं संगोपन यामुळे जोडप्यांना एकमेकांसाठी वेळ मिळतोच असं नाही. दैनंदिन कामात इतकं व्यग्र व्हायला होतं, की प्रिय व्यक्तिजवळ प्रेम व्यक्त करायलाही फुरसत मिळत नाही. काहींना तर एकमेकांची साधी विचारपूस करणं होत नाही. खरं तर, एकमेकांसाठी जगणं, एकमेकांचा आनंद समाधान जपणं या गोष्टी नात्यातला गोडवा वाढवण्याचं काम करतात. तुमच्या नात्यामध्ये नव्याने प्रेम आणि ताजेपणा आणतात.*
*एकाच छताखाली राहत असूनही कामातील व्यस्ततेमुळे तुमच्यात संवाद होत नसेल, तर तो होऊ द्या. सशक्त नातेसंबंधांसाठी एकमेकांशी विविध विषयांवर बोलणं, चर्चा करण गरजेचं आहे. घराबाहेर एकत्र, एकांतात वेळ घालवणं, बागेत जाऊन, फोन बाजूला ठेऊन भरपूर गप्पा मारल्याने परस्परांतील नाती घट्ट होतात.*
🎄 *॥ रामकृष्णहरी ॥*🎄
💧💧💧💧💧💧
*--संजय नलावडे, चांदिवली,मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
🎯 *वि चा र वे ध.......✍🏻*
〰〰〰〰〰〰〰〰
पक्षी जेव्हा आकाशाकडे झेप घेतात आणि आकाशात स्वच्छंदपणे विहार करतात तेव्हा त्यांची सारी दृष्टी खाली असलेल्या जमिनीकडेच असते. ते कधीच आकाशाकडे पाहत नाहीत. त्याचप्रमाणे कितीही आणि कोणतीही व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने उच्च पदावर जाऊन पोहचली तरी त्यांची सारी दृष्टी सर्वसामान्यपणे जीवन जगणा-या माणसाकडेच असते.
कारण त्यांच्या जीवनातला असलेला अंधःकार कशापध्दतीने दूर करता येईल याचा ती सतत विचार करत असते.अशीच व्यक्ती समाजाच्या दृष्टीकोनातून महान म्हणून ओळखली जाते.अशाच व्यक्ती उच्च पदावर जातात आणि नावलौकीकास पात्र ठरतात.त्यांना कधीच गर्वाने स्पर्श केलेला नसतो हे मात्र खरे आहे.
- व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद.9421839590/
8087917063.
🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎🕊🌎
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
"एका तळयात एक कासव रहात होते. त्याचे दोन हंस मित्र होते ते त्याला कधी कधी भेटायला यायचे. तो तासन तास गप्पा मारायचे. ते हंस त्या जागेपासून खूप उंच आणि वर उडायचे व परत आल्यानंतर कासवाला त्यांनी केलेले साहसी कृत्य सांगायचे.
खूप जास्त उन्हामुळे कासव रहात असलेले तळे हळूहळू कोरडे व्हायला लागते व लवकरच त्या तळयात थोडेच पाणी शिल्लक रहाते, त्यामुळे ते कासव काळजीत पडते.
एके दिवशी ते हंस त्याला बघायला येतात, तेव्हा ते बघतात की कासव खूप काळजीत आहे. ‘काय समस्या आहे मित्रा? तू असा काळजीत का दिसतोस?’ एक हंस बोलला.
‘हे तळे आता कोरडे पडत आहे. तुम्हाला माहिती आहे ना की, मी पाण्याशिवाय जगूच शकत नाही. जर हे तळे पूर्णपणे कोरडे झाले तर, मी मरून जाईल.’ ते गरीब कासव बोलेले.
मरण्याच्या विचाराने ते हंस खूपच दुःखी झाले, कारण त्यांना त्याच्या मित्राला वाचवयाचे होते.
‘आम्ही तुला कशा प्रकारे मदत करू शकतो?’ ते बोलले.
कासव बोलले ‘मी असा विचार करतो आहे की आता मी संपणार आहे.’
ते तिघे मित्र अनेक मार्गांनी विचार करतात की कासवाला कसे वाचवावयाचे.
शेवटी कासव बोलते की ‘ऐका माझ्याकडे एक कल्पना आहे, आपण एक काठी घेऊ या मी मधोमध त्या काठीला माझ्या दाताने पकडेल, तुम्ही दोघ काठीचे दोन्ही टोक आपल्या पायात पकडा व उडा, अशा प्रकारे तुम्ही मला दुसऱ्या तळयात घेऊन चला. जिथे भरपूर पाणी असेल.’
हंस तयार झाले पण ते कासवाला बजावून सांगतात की, ‘आम्ही तुला सुरक्षित घेऊन जाऊ परंतु आपल्या या प्रवासात एक धोका आहे, तू मात्र काहीही बोलू नकोस आणि काठीवरची पकड सोडू नकोस. जर तू तुझी पकड सोडली तर उंचावरून पडल्याने तात्काळ तुझा जीव जाऊ शकतो.’
‘मी याबाबतीत दक्ष राहीन.’ कासव बोलला, तुम्ही जा व काठी घेऊन या म्हणजे आपण आपला प्रवास चालू करू शकतो.
हंस काठी घेऊन येतात. कासव त्याच्या दाताने काठी पकडते. दोन्ही हंस काठीची दोन्ही टोके पकडतात आणि उडायला सुरूवात करतात. ते जंगल, डोंगर, झाडे व गाव यावंरून उडतात. जेव्हा ते गावाजवळून उडतात तेव्हा गावातील लोक त्याकडे बघतात आणि आश्चर्य चकित होऊन बोलतात ‘आम्हाला यावर विश्वासच बसत नाही, किती सुंदर दृश्य आहे हे.’
कासवाला खूप अभिमान वाटला. त्याला असे वाटले की सर्वांचे लक्ष हे माझ्याकडेच आहे. त्याला असे वाटले की, आपण हे सर्व हंसाना सांगावे. कोणाच्याही हे लक्षात आले नाही की, हंस उडत आहे ते फक्त कासवामुळेच. हे सर्व बघून लोक कौतुक करत होते. जसजसे ते एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे उडत होते तसतसे कासवाला जास्तीत जास्त अभिमान वाटत होता.
शेवटी त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि त्याने हंसाचे आभार मानण्यासाठी तोंड उघडले. ‘ज्या क्षणाला त्याने तोंड उघडले, तेव्हा त्याची काठीवरची पकड सुटली आणि तो खाली जमिनीवर पडला व मेला.’ हंस त्याच्याकडे दुःखी होऊन बघतात व बोलतात, ‘जर कासवाने आपल्या सल्याचे पालन केले असते तर असे घडलेच नसते.’ आणि नंतर ते उडून जातात.
*तात्पर्य - मुर्खपणाची कृती एखादयाचा मृत्यू घडवून आणण्यास कारणीभूत ठरते. "*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●•
*✍संकलन ✍ साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
──┅━━═▣▣═━━┅──
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment