✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणा सोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 01/03/2017 वार - बुधवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
*जागतिक नागरी संरक्षण दिवस*
⌛१९०७- टाटा आर्यन अॅन्ड स्टील कंपनीची स्थापना
⌛१८१८- सिंहगड किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला.
⌛१९१९- रॉलट अॅक्ट निषेधार्थ महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाला रारंभ केला.
⌛१९५८- कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीस सुरुवात
💥 मृत्यू
⌛१९९४- महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव दादा पाटील यांचे निधन
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ नोटबंदीनंतरही जीडीपी ७ टक्क्यांवर
2⃣ महाराष्ट्रातील प्रकल्पांना जागतिक बँकेचे १ अब्ज डॉलर्सचे सहाय्य
3⃣ तूर खरेदीची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढवणार
4⃣ मुंबईच्या कोस्टल रोडला महिनाभरात परवानगी!
5⃣ मते सुरक्षित ठेवण्यासाठी सेनेच्या नगरसेवकांची नवी मुंबई वारी
6⃣ अर्थसंकल्पीय अधिवेशनातच सत्तेबाहेर पडण्याची शक्यता
7⃣ दुसर्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचे
फास्ट गोलंदाज हल्ला चढवतील
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
🌾🌺🌿🍃🌾🌺🌿🍃🌾🌺🌿
*"आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवासारखीच असतात.*
*काही फांदीसारखी ― जास्त जोर दिला कि तुटणारी..*
*काही पानासारखी ― अर्ध्यावर साथ सोडणारी..*
*काही काट्यासारखी ―सोबत असून टोचत राहणारी..*
*आणि काही मुळांसारखी ― न दिसताही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत साथ देणारी."*
*संकलक :- नामदेव यलकटवार, संपादक*
8087106666
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*आयुष्य*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 आशा तेलंगे, मुंबई
👤 साहेबराव बोने, देगलुर
👤 अमोल अलगुडे, उमरगा
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
*" अविश्वास "*
आपल्यांवर आपल्यांचा
हल्ली अविश्वास आहे
स्वतःच्याच प्रगतीचा
सर्वांना ध्यास आहे
मतलबी लोकांमुळे
विश्वास घटत आहे
मतलब्यांनाच तर हे
सारं पटत आहे
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔 जाहिरात 🔔 🔔*
*✏ मुक्तांगण लघूलेखन स्पर्धा 🖍*
••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*विषय :- स्वच्छता, आरोग्य, सवय*
*कालावधी :- 01 मार्च ते 05 मार्च*
••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*♻ स्पर्धेचे नियम व अटी ♻*
🏵 ही स्पर्धा फक्त फेसबुकवर त्याच पोस्टच्या खाली comment बॉक्स द्वारे घेण्यात येईल.
⚽ दिलेल्या तीन शब्दाच्या आधारावर लेख लिहावे लागेल. लेखात त्या तीनही शब्दाचा उल्लेख असणे आवश्यक आहे.
🏀 जास्तीत जास्त 100 ते 150 शब्दात लेख लिहावे लागेल. त्यावरील शब्दाचे लेख स्पर्धेतून बाद होतील.
⚾ बुधवार ते रविवार या दिवशी ही स्पर्धा सर्वासाठी खुली राहील.
🎈 कमीत कमी 20 तरी लेख स्पर्धेत आले तरच स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येईल.
🎾 लेखाखाली एकूण शब्दाची संख्या, आपले पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक आणि कंसात मोबाईल कंपनीचे नाव लिहिणे आवश्यक आहे. अन्यथा आपला लेख स्पर्धेसाठी ग्राह्य समजले जाणार नाही.
❌ आक्षेपार्ह किंवा अश्लील लेख लिहू नये.
✳ रविवार रात्री 12 च्यानंतर करण्यात आलेली पोस्ट स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
🏅स्पर्धेतील प्रथम विजेते ठरविताना पंचाचा निर्णय अंतिम राहील.
*📝 लिहिता लिहिता लिहिते होऊ या*
*☣ मुक्तांगण लघुलेखन कमिटी ☣*
-----------------------------------------------------
*आजचा*
🔻🔻‼ *विचार धन* ‼🔻🔻
*कडू शब्दांनी माणसं दुरावतात तर मधुर शब्दांनी जोडली जातात. त्यामुळे शब्द मोजून-मापून-तोलून वापरण्याचा संदेश संत देतात. शब्द हे शस्त्र असल्याचे सांगतात. त्याचा आपण गांभीर्याने विचार करून ते आचरणात आणावे. 'शब्द आणि ते ज्या वाणीतून बाहेर पडतात ती वाणी' हे अमृत असल्याचे आपण आपल्याला रोज समजून सांगू, तेव्हाच उत्कर्ष शक्य आहे. ओजस्वी, प्रासादिकता, मांगल्य या शब्द आणि जिव्हाशक्तीशी निगडीत बाबी जगण्याला बळ देतात. आपण चांगले बोलल्याने समोरच्याच्या चेह-यावर विलासणारा आनंद समाधान देतो. काम भले एक दिवस उशीरा होईल; पण जे होईल ते पुन्हा कधी डोके वर काढणार नाही. त्यामुळे संवादाला सुसंवादाच्या पातळीवर नेण्याचे कसब आपल्याला साधायला हवे.*
*माणसे येतात आणि जातात लक्षात राहतो तो फक्त त्याचा स्वभाव. गेल्यानंतर "फार चांगला माणूस होता" हे एक वाक्य आयुष्यभराच्या कामाचा विजय असतो. शब्द मागे उरतात ते कसे होते याची चर्चा होते आणि ती फक्त व्यक्तीच्या बोलण्यावर अवलंबून असते. त्यामुळे चांगले वागुया, चांगले बोलुया. त्यासाठी अंत:करण शुद्ध हवे. क्लास लावून अमृततुल्य बोलता येत नाही. तिथे जाऊन फार तर पोपट होता येईल. आपल्याला पोपट नव्हे तर कोकिळ होता यायला हवे. असे होणे म्हणजे उन्नती.*
🔸‼ *रामकृष्णहरी* ‼🔸
🔰🔰🔰🔰🔰🔰
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
🎯 विचारवेध..........✍🏻
====================
ज्याप्रमाणे पाणी पिल्यामुळे तहान भागविता येते.अन्न सेवन केल्यामुळे भूक भागविता येते.त्याचप्रमाणे चांगल्या ग्रंथांच्या आणि चांगल्या पुस्तकांच्या सानिध्यात राहिल्यामुळे ज्ञानाचीही भूक भागविता येते.या ज्ञानाच्या भूकेमुळे माणसाला चांगले जीवन जगण्याची आशा पल्लवीत होते.
- व्यंकटेश काटकर, नांदेड.
संवाद.9421839590/
8087917063.
🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺🍃
-----------------------------------------------------
*वपुर्झा*
आपण सगळे अपूर्णच आहोत. परमात्मा म्हणजे पूर्णत्व. तोच कृष्ण. कृष्ण म्हणजे पूर्णत्वाप्रत नेणारी एक शिडी. एकेक पायरी चढेपर्यंत आपण सगळे अर्जुन. संभ्रम जेवढया प्रमाणात जास्त किंवा कमी, तेवढया प्रमाणात शिडीच्या पायऱ्या. उडी घेणाच्या क्षण म्हणजे संभ्रमसमाप्ती. हेच कृष्णत्व. अर्जुनाचा कृष्ण होण.
~ वपु काळे | आपण सारे अर्जुन
*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
*आयुष्याची खरी किंमत*
एका नातवाने आपल्या आजोबांना प्रश्न विचारला आयुष्याची खरी किंमत काय असते हो? आजोबांनी त्याला एक दगड दिला आणि म्हणाले ह्या अगोदर तू ह्या दगडाची खरी किंमत कळावी अशी माझी इच्छा आहे. दगडाची फक्त किंमत काढून ये , विकू नकोस सर्वप्रथम नातवाने एका फळवाल्याला त्या दगडाची किंमत विचारली .तो त्या चकाकणाऱ्या दगडाला बघून म्हणाला -.या दगडाचा मोबदला म्हणून मी तुला एक डझन सफरचंदे देऊ शकतो. नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्याबद्दल त्याची माफी मागितली व निघाला, वाटेत त्याला एक भाजीवाला दिसला आणि त्याने त्याला त्या चकाकणाऱ्या दगडाची किंमत विचारली- मी तुम्हाला याच्या बदल्यात एक पूर्ण पोते भरून बटाटे देऊ शकतो. पुन्हा एकदा नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्या बद्दल त्याची माफी मागितली व निघाला. आता त्याला एका सराफाचे दुकान लागले. आत जाऊन त्याने तो चमकणारा दगड सराफाला दाखवून त्याची किंमत विचारली. आपल्या भिंगातून त्या खड्याचे निरीक्षण करताच तो सराफ उत्तरला -या खड्यासाठी मी तुम्हाला दश लक्ष रुपये देऊ शकतो. नातवंडाला फार आश्चर्य वाटले पण नातवाने आजोबांच्या आज्ञेमुळे दगड विकू शकत नसल्या बद्दल त्याची माफी मागितली व निघाला. थोडे पुढे आल्यावर त्याला अतिशय दुर्मिळ रत्न आणि मणी विकणारे दुकान दिसले. त्याने तो दगड तिथल्या रत्नपारख्यास दाखवला. तो रत्नपारखी ह्या विषयात अतिशय निष्णात होता.त्याने अलगद तो दगड एका मखमली कापडावर ठेवला. त्या दगडाच्या अवती भोवती प्रदक्षिणा घालत तो म्हणाला -अहो, एवढा अमूल्य दुर्मिळ अनघड हिरा तुम्ही कुठून बरे आणला? मी माझे अख्खे दुकान जरी विकले तरी सुध्दा ह्या हिऱ्याची किंमत तुम्हाला देऊ नाही शकणार, आता मात्र नातू अतिशय चकित झाला आणि गोंधळलेल्या मनःस्तिथीत तो आजोबांकडे परतला, त्याचे सर्व अनुभव ऐकून आजोबा म्हणाले - मला वाटते फळवाला, भाजीवाला, सराफ आणि रत्नपारखी ह्यांच्या उत्तरावरून तुला आयुष्याच्या मोलाविषयी कळले असेल. तुम्ही जरी अतिशय दुर्मिळ अमूल्य हिरा असलात तरी सुध्दा लोक तुमची किंमत त्यांच्या सीमित समजुती, आकलनशक्ती,हेतू आणि कुवती नुसारच करणार. त्यामुळे आयुष्यात स्वतःची किंमत जाणून घेणे सर्वात महत्वाचे असते. स्वतःचा आदर करा.इतरांबरोबर कोण्यात्याही निरर्थक तुलने मध्ये गुंतू नका, कारण तुम्ही या विश्वातील एक अभिनव आणि अद्वितीय निर्मिती आहेत.
*तात्पर्य*-तुमच्या सारखे फक्त तुम्हीच आहात. हीच तुमच्या आयुष्याची खरी किंमत आहे. आपल्या सर्वांनाही स्वतःची खरी किंमत कळून स्वतःवर प्रेम करायला शिकू.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●•
*✍संकलन ✍ साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
──┅━━═▣▣═━━┅──
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment